ट्रिपल एम ते राजधानी
गेल्या पंधरवड्यात सकाळी कर्जत ते मुंबई लोकल ने प्रवास करत होतो. ती फास्ट लोकल होती परळ येथे प्लॅटफॉर्म अपुरा पडतो १२ डब्याच्या लोकल ला तेव्हा दोन वेळा थांबली ....................
तेव्हा
मनाने धाव घेतली १९९० पूर्वी, म्हणजे १९८७-८८ मध्ये मी संध्याकाळी प्रवासी म्हणून ट्रिपल एम लोकल ने मुंबई ते मुलुंड प्रवास करायचो, विशेषतः संध्याकाळी होती सव्वा सहा ते साडे सहा सुमारास, बहुतेक ०६:२८ ची लोकल ट्रिपल एम असायची,मस्जिद, माटुंगा आणि मुलुंड असे हॉल्ट होते...
मस्जिद बंदरला पाचवा सहावा प्लॅटफॉर्म होता पण तो लहान होता म्हणून ९ डब्याची लोकल दोन वेळा थांबायची.
वडील १९५०-५३ मध्ये ठाण्याहून मुंबईला कॉलेजला जायचे तेव्हाची आठवण सांगायचे ते आणि काही मित्र कधी कधी दोन ठिकाणी बटाटा वडा खायला जायचे एकतर दादर येथे मामा काणे नाहीतर कर्जत येथे दिवाडकर वडा ! वडापाव खूप नंतर १९७०-८० दशकात आला.
रेल्वेच्या स्टेशन आणि प्लॅटफॉर्म आधुनिकीकरणात रुंदीकरणात खूप जुन्या आठवणीची ठिकाणे बदलली. कुर्ला कारशेड ला न्यू कुर्ला कारशेड का म्हणतात ? ह्या बद्दल सांगितले जाते आधीची छोटी कारशेड कुर्ला यार्ड च्या आधी होती आणि मग ती पश्चिम बाजूला निर्माण झाली.
कुर्ल्याचे जुने स्टेशन म्हणे आत्ता खूप सारे कुर्ला पूर्वेकडील टेकडीच्या समोर भागात होते आणि तेथील मुन्सिपल शाळेचे नाव ओल्ड स्टेशन कुर्ला शाळा होते.
ठाण्याला आताच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या मुलुंड मुंबई बाजूला ब्रिज बाजूला एक लाकडी ठोकळ्यांचे आणि लाकडी घड्याळ्यांचे इंडिकेटर होते. ब्रिज खाली टी. सी. ऑफिस मधून एक कर्मचारी हॅन्डल वाला रेल्वे इंटरकॉम फिरवून पुढच्या गाड्या विचारायचा आणि मग येऊन लाकडी ठोकळे आणि घडाळ्याचे काटे फिरवायचा
ठाण्याच्या पुढे डोंबिवली स्टेशनचे चार प्लॅटफॉर्म आणि त्याच्या बाजूचे लेव्हल क्रॉसिंग गेट आठवते.
आत्ताचे ठाणे एक नंबर प्लॅटफॉर्म आणि कल्याण एक नंबर प्लॅटफॉर्म हे मालधक्के होते आणि प्रामुख्याने सिमेंट आणि अन्नधान्य गोणीतून उतरायचे.
मुंबईला १९९० पूर्वी फक्त १५ प्लॅटफॉर्म होते त्यात ९-१५ प्लॅटफॉर्म वर खूप मोठी पोलादाची हायड्रॉलिक बफर्स होती, त्यात प्रचंड पाणी भरलेले होते, क्रमांक १६-१८ आणि पुढील भाग १९९० पूर्वी कर्नाक बंदर म्हणून ओळखला जायचा आणि तो पश्चिम रेल्वेच्या ताब्यात होता.
पुश पूल तंत्रज्ञान पद्धत मध्य रेल्वे ला नवी नाही, साधारण तश्याच पद्धतीचे तंत्र वापरून तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री कै सुरेश कलमाडी ह्यांच्या प्रयत्नाने मुंबई पुणे मुंबई वातानुकूलित शताब्दी एक्सप्रेस सुरु झाली होती तिला मुंबई पासूनच पुढे मागे इंजिन होती पण व्यावसायिक दृष्ट्या ती यशस्वी झाली नाही झाली नाही पुढे त्याच मार्गावर म्हणजे रेल्वेपाथवर इंटर सिटी नावाची गाडी धावू लागली जी यशस्वी झाली.
मन आठवणीत राजधानी एक्सप्रेस वेगानेच धावत होते आत्ताची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन दिल्ली राजधानी मध्य रेल्वे मार्गे १९ जानेवारी २०१९ रोजी सुरु झाली आणि थोड्याच कालावधीत रोज धावू लागली........ हिवाळयात धुक्याच्या काळात थोडी विलंबाने चालते पण अजूनतरी वंदे भारत पुढे राजधानीचा रुबाब आहे.
© रविंद्र गांगल
( आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर हे लेखन आधारित आहे आणि “शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग)
(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)
गेल्या पंधरवड्यात सकाळी कर्जत ते मुंबई लोकल ने प्रवास करत होतो. ती फास्ट लोकल होती परळ येथे प्लॅटफॉर्म अपुरा पडतो १२ डब्याच्या लोकल ला तेव्हा दोन वेळा थांबली ....................
तेव्हा
मनाने धाव घेतली १९९० पूर्वी, म्हणजे १९८७-८८ मध्ये मी संध्याकाळी प्रवासी म्हणून ट्रिपल एम लोकल ने मुंबई ते मुलुंड प्रवास करायचो, विशेषतः संध्याकाळी होती सव्वा सहा ते साडे सहा सुमारास, बहुतेक ०६:२८ ची लोकल ट्रिपल एम असायची,मस्जिद, माटुंगा आणि मुलुंड असे हॉल्ट होते...
मस्जिद बंदरला पाचवा सहावा प्लॅटफॉर्म होता पण तो लहान होता म्हणून ९ डब्याची लोकल दोन वेळा थांबायची.
वडील १९५०-५३ मध्ये ठाण्याहून मुंबईला कॉलेजला जायचे तेव्हाची आठवण सांगायचे ते आणि काही मित्र कधी कधी दोन ठिकाणी बटाटा वडा खायला जायचे एकतर दादर येथे मामा काणे नाहीतर कर्जत येथे दिवाडकर वडा ! वडापाव खूप नंतर १९७०-८० दशकात आला.
रेल्वेच्या स्टेशन आणि प्लॅटफॉर्म आधुनिकीकरणात रुंदीकरणात खूप जुन्या आठवणीची ठिकाणे बदलली. कुर्ला कारशेड ला न्यू कुर्ला कारशेड का म्हणतात ? ह्या बद्दल सांगितले जाते आधीची छोटी कारशेड कुर्ला यार्ड च्या आधी होती आणि मग ती पश्चिम बाजूला निर्माण झाली.
कुर्ल्याचे जुने स्टेशन म्हणे आत्ता खूप सारे कुर्ला पूर्वेकडील टेकडीच्या समोर भागात होते आणि तेथील मुन्सिपल शाळेचे नाव ओल्ड स्टेशन कुर्ला शाळा होते.
ठाण्याला आताच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या मुलुंड मुंबई बाजूला ब्रिज बाजूला एक लाकडी ठोकळ्यांचे आणि लाकडी घड्याळ्यांचे इंडिकेटर होते. ब्रिज खाली टी. सी. ऑफिस मधून एक कर्मचारी हॅन्डल वाला रेल्वे इंटरकॉम फिरवून पुढच्या गाड्या विचारायचा आणि मग येऊन लाकडी ठोकळे आणि घडाळ्याचे काटे फिरवायचा
ठाण्याच्या पुढे डोंबिवली स्टेशनचे चार प्लॅटफॉर्म आणि त्याच्या बाजूचे लेव्हल क्रॉसिंग गेट आठवते.
आत्ताचे ठाणे एक नंबर प्लॅटफॉर्म आणि कल्याण एक नंबर प्लॅटफॉर्म हे मालधक्के होते आणि प्रामुख्याने सिमेंट आणि अन्नधान्य गोणीतून उतरायचे.
मुंबईला १९९० पूर्वी फक्त १५ प्लॅटफॉर्म होते त्यात ९-१५ प्लॅटफॉर्म वर खूप मोठी पोलादाची हायड्रॉलिक बफर्स होती, त्यात प्रचंड पाणी भरलेले होते, क्रमांक १६-१८ आणि पुढील भाग १९९० पूर्वी कर्नाक बंदर म्हणून ओळखला जायचा आणि तो पश्चिम रेल्वेच्या ताब्यात होता.
पुश पूल तंत्रज्ञान पद्धत मध्य रेल्वे ला नवी नाही, साधारण तश्याच पद्धतीचे तंत्र वापरून तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री कै सुरेश कलमाडी ह्यांच्या प्रयत्नाने मुंबई पुणे मुंबई वातानुकूलित शताब्दी एक्सप्रेस सुरु झाली होती तिला मुंबई पासूनच पुढे मागे इंजिन होती पण व्यावसायिक दृष्ट्या ती यशस्वी झाली नाही झाली नाही पुढे त्याच मार्गावर म्हणजे रेल्वेपाथवर इंटर सिटी नावाची गाडी धावू लागली जी यशस्वी झाली.
मन आठवणीत राजधानी एक्सप्रेस वेगानेच धावत होते आत्ताची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन दिल्ली राजधानी मध्य रेल्वे मार्गे १९ जानेवारी २०१९ रोजी सुरु झाली आणि थोड्याच कालावधीत रोज धावू लागली........ हिवाळयात धुक्याच्या काळात थोडी विलंबाने चालते पण अजूनतरी वंदे भारत पुढे राजधानीचा रुबाब आहे.
© रविंद्र गांगल
( आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर हे लेखन आधारित आहे आणि “शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग)
(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)

No comments:
Post a Comment