Wednesday, 29 April 2026

 बदल हवाय असे वाटते आहे  - महाराष्ट्र देशा

शेवटच्या चाकावरून 


परत खूप साऱ्या दिवसांनी हे लिहायला घेताना, सहज मनात आले कि आपण सगळेच खूप बदल अनुभवतोय, एक्सप्रेस वरून फ्री वे, अटल सेतू , समृद्धी, टनेल्स प्रवासाची सुरवात, मेट्रो, ए सी लोकल्स, वंदे भारत विस्तार पुढे आता महाराष्ट्र दिनी सुरु होणारी मिसिंग लिंक 


मागे एका लेखात लिहिले होते कि खंडाळ्याचा घाटातून रात्री अपरात्री मेल ट्रेन वरून काम करताना खूप साऱ्या वाहनाच्या रांगा दिसतात कधी त्यांचे दिवे धावत असतात तर एका ठिकाणी खोळंबलेले असे भोर घाटा सारखे थळ घाटात पण दिसायचे पण आधी एक्सप्रेस वे नंतर समृद्धीने ती वाहतूक एकदम जलद गतीने होताना दिसते 


आमच्या काही सहकाऱ्यांनी ह्या वाहतूक वेगा बरोबर सामाजिक जाणिवेचा वेग हि चांगला धरला आहे, पूर्वी एक सातत्य मंडळ होते आमच्या कर्मचाऱ्याचे ! 

 ते आमच्या रेल्वे कुटुंबातील मुलांना मुलींना शैक्षणिक बक्षिसे देत होते पुढे आता आमच्या एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी तर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गुणी  मुली मुलांचा सत्कार आणि रोख बक्षिसे देतात. 


पुढे इनर व्हॉइस, रेल मित्र परीस स्पर्श तसेच महाराष्ट्र मंडळ, शिव जयंती मंडळ व पे बॅक टू सोसायटी अश्या संस्था आणि उपक्रम रेल्वे कर्मचारी इतर समाज वर्गासाठी चालवत असतात. 


बदल हवाय महाराष्ट्र देशी ..................... असे शीर्षक आणि लेख सुचला त्याचे कारण असे झाले कि 


नदीत कपडे धुताना महिलेचा मृत्यू असे वाचनात आले ...................


सहज ह्यातील काही शब्द सर्च इंजिन वर टाकले आणि वाचले तर खुप साऱ्या घटना आणि बातम्या आहेत . खूप वाईट वाटले 


मध्यंतरी माझा एक जुना लोकल मोटरमन नातेवाईक सहकाऱ्यांची भेट झाली, त्यांनी दोन एक वर्षा पूवी स्वेच्छा निवृत्ती घेतली, विचारले काय करतोस हल्ली तर म्हणाला समाजात काम करणारे काही क्लब / संस्था आहेत त्यात काम करतो, मग मी त्याला म्हंटले माझ्या मनात एक विषय खूप वादळ करतो आहे तो मी लवकरच लिहिणार असे नक्की वाच.


दख्खन च्या पठारा वरून म्हणजे पुण्या कडून अथवा झालेच तर राजधानी अथवा वंदे भारत जळगाव अथवा शिर्डी वरून झालेच तर रत्नागिरी वरून मुंबई कडे येताना अनेक ठिकाणी नद्या दिसतात त्या नद्यांच्या काठावर दिवसा म्हणजे खास करून दिवस दुपार कडे वळताना अनेक स्त्रिया नदी तीरावर कपडे धुणी दिसताना दिसतात अथवा भांडी घासताना दिसतात. 


ओह दुःखाने सांगावेसे वाटते कि खूप घटना अश्या आहेत ह्या बाया बापड्या काही वेळा वाहून जातात तर काही वेळा ह्यात त्यांना प्राण गमवावे लागत आहेत, त्या वेळेस त्यांना वाचणारे जवळ जवळ कुणीच नसते,  आता ह्याच भागात जसे परदेशात असतात तसे वेगवान रस्ते होत आहेत, मेट्रो बुलेट ट्रेन नवीन विमानतळ होत आहेत, परदेशात जे लेटेस्ट प्रॉडक्ट आणि सर्व्हिस आहे ती इथे उपलब्ध होत आहेत मग मनात येते परदेशात रेंटल हौसिंग कॉम्प्लेक्स मध्ये कम्युनिटी लाँड्री मशिन्स असतात, त्यावर भाडेकरू सदनिका धारक आपल्या कपड्यांचा लॉट टाकतो धुणे वाळवणे आणि कोरडे होणे हे सगळे ते लाँड्री मशीन करते, बरं, ते मशीन सुंदर लॉक होते आणि सिम कार्ड अथवा मोबाईल अँप द्वारे पेमेंट केले कि सुरु होते. 


आता बाया बापड्या धुणी धुताना वाहून जातात, नदीचे पाणी प्रदूषित होते त्या ऐवजी निदान महा मुंबई आणि महा पुण्याच्या  जवळ काही सामाजिक संस्था. सोशल स्टेटस वेल्फेअर क्लब तसेच काही श्रीमंत देवस्थाने अथवा उत्सव मंडळे ह्यांनी अश्या काही ठिकाणी नदी काठी  कम्युनिटी लाँड्री मशीन बसवण्याची व्यवस्था केली तर बाया बापड्यांचा जीव वाचेल, नदी प्रदूषित होण्याची वाचेल, नारू सारख्या रोगराई ( हल्ली आपल्या कडे नाही असे वाचनात आले, चांगलेच आहे)  अथवा तत्सम अनेक व्याधी पासून त्या दूर राहतील  तसेच ते मशीन होताना त्या स्त्रियांना साक्षरता वर्ग प्रौढ शिक्षण कुटुंब कल्याण कार्यक्रम तसेच मुलांचा अभ्यास अथवा स्वतः साठी वाचन करू शकतील.


कम्युनिटी वॉशिंग मशिन्स जर लोक प्रतिनिधी निधी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसेस अथवा ग्रामस्थ मंडळे ह्यांचा मार्फत बसवता येतील का हे पण पडताळून बघायला हवे अथवा आपल्या प्रगतिशील राज्यात अनेक संस्था अथवा वेल्फेअर / चॅरिटी क्लब अथवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसबलीटी अंतर्गत कंपन्या कडून मदत घेता येऊ शकेल असे वाटते.नाम मात्र अथवा देखभाल शुल्क हे संस्थांनी आणि उपयोगकर्त्या मंडळीने वाटून भरावे 


येणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


@रविंद्र गांगल 

शेवटच्या चाकावरून 

३० एप्रिल २०२६ 


(पोस्ट चा बहुतेक भाग मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर आधारित आहेत,  एखाद्या विषयाचे समयोचित  कौतुक आणि आकलन आवश्यक आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया, सूचना,  कौतुक आणि टीका ह्यातुन आणखीन काही शिकायला मिळेल  ह्या अपेक्षेने हा खटाटोप !) (“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग) (चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)


Saturday, 31 January 2026

ट्रिपल एम ते राजधानी

गेल्या पंधरवड्यात सकाळी कर्जत ते मुंबई लोकल ने प्रवास करत होतो. ती फास्ट लोकल होती परळ येथे प्लॅटफॉर्म अपुरा पडतो १२ डब्याच्या लोकल ला तेव्हा दोन वेळा थांबली ....................
तेव्हा
मनाने धाव घेतली १९९० पूर्वी, म्हणजे १९८७-८८ मध्ये मी संध्याकाळी प्रवासी म्हणून ट्रिपल एम लोकल ने मुंबई ते मुलुंड प्रवास करायचो, विशेषतः संध्याकाळी होती सव्वा सहा ते साडे सहा सुमारास, बहुतेक ०६:२८ ची लोकल ट्रिपल एम असायची,मस्जिद, माटुंगा आणि मुलुंड असे हॉल्ट होते...

मस्जिद बंदरला पाचवा सहावा प्लॅटफॉर्म होता पण तो लहान होता म्हणून ९ डब्याची लोकल दोन वेळा थांबायची.

वडील १९५०-५३ मध्ये ठाण्याहून मुंबईला कॉलेजला जायचे तेव्हाची आठवण सांगायचे ते आणि काही मित्र कधी कधी दोन ठिकाणी बटाटा वडा खायला जायचे एकतर दादर येथे मामा काणे नाहीतर कर्जत येथे दिवाडकर वडा ! वडापाव खूप नंतर १९७०-८० दशकात आला.

रेल्वेच्या स्टेशन आणि प्लॅटफॉर्म आधुनिकीकरणात रुंदीकरणात खूप जुन्या आठवणीची ठिकाणे बदलली. कुर्ला कारशेड ला न्यू कुर्ला कारशेड का म्हणतात ? ह्या बद्दल सांगितले जाते आधीची छोटी कारशेड कुर्ला यार्ड च्या आधी होती आणि मग ती पश्चिम बाजूला निर्माण झाली.

कुर्ल्याचे जुने स्टेशन म्हणे आत्ता खूप सारे कुर्ला पूर्वेकडील टेकडीच्या समोर भागात होते आणि तेथील मुन्सिपल शाळेचे नाव ओल्ड स्टेशन कुर्ला शाळा होते.

ठाण्याला आताच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या मुलुंड मुंबई बाजूला ब्रिज बाजूला एक लाकडी ठोकळ्यांचे आणि लाकडी घड्याळ्यांचे इंडिकेटर होते. ब्रिज खाली टी. सी. ऑफिस मधून एक कर्मचारी हॅन्डल वाला रेल्वे इंटरकॉम फिरवून पुढच्या गाड्या विचारायचा आणि मग येऊन लाकडी ठोकळे आणि घडाळ्याचे काटे फिरवायचा

ठाण्याच्या पुढे डोंबिवली स्टेशनचे चार प्लॅटफॉर्म आणि त्याच्या बाजूचे लेव्हल क्रॉसिंग गेट आठवते.

आत्ताचे ठाणे एक नंबर प्लॅटफॉर्म आणि कल्याण एक नंबर प्लॅटफॉर्म हे मालधक्के होते आणि प्रामुख्याने सिमेंट आणि अन्नधान्य गोणीतून उतरायचे.

मुंबईला १९९० पूर्वी फक्त १५ प्लॅटफॉर्म होते त्यात ९-१५ प्लॅटफॉर्म वर खूप मोठी पोलादाची हायड्रॉलिक बफर्स होती, त्यात प्रचंड पाणी भरलेले होते, क्रमांक १६-१८ आणि पुढील भाग १९९० पूर्वी कर्नाक बंदर म्हणून ओळखला जायचा आणि तो पश्चिम रेल्वेच्या ताब्यात होता.

पुश पूल तंत्रज्ञान पद्धत मध्य रेल्वे ला नवी नाही, साधारण तश्याच पद्धतीचे तंत्र वापरून तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री कै सुरेश कलमाडी ह्यांच्या प्रयत्नाने मुंबई पुणे मुंबई वातानुकूलित शताब्दी एक्सप्रेस सुरु झाली होती तिला मुंबई पासूनच पुढे मागे इंजिन होती पण व्यावसायिक दृष्ट्या ती यशस्वी झाली नाही झाली नाही पुढे त्याच मार्गावर म्हणजे रेल्वेपाथवर इंटर सिटी नावाची गाडी धावू लागली जी यशस्वी झाली.

मन आठवणीत राजधानी एक्सप्रेस वेगानेच धावत होते आत्ताची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन दिल्ली राजधानी मध्य रेल्वे मार्गे १९ जानेवारी २०१९ रोजी सुरु झाली आणि थोड्याच कालावधीत रोज धावू लागली........ हिवाळयात धुक्याच्या काळात थोडी विलंबाने चालते पण अजूनतरी वंदे भारत पुढे राजधानीचा रुबाब आहे.

© रविंद्र गांगल
( आठवणी प्रमाणे आणि केवळ काही मिनटात मी घेतलेल्या / मिळालेल्या माहिती वर हे लेखन आधारित आहे आणि “शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या आगामी आत्मचरित्र पर लिखाणाचा एक भाग)
(चूकभूल आणि थोडे लेखन स्वातंत्र्य क्षम्य असावे.)